महाराष्ट्रात गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा! | लातूरमध्ये पिकांचं मोठं नुकसान
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-03-17
Просмотров: 3839
Описание:
राज्यात आजपासून 20 मार्चपर्यंत वादळी पावसासह गारपिटीची शक्यता India Meteorological Department म्हणजेच हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. उद्यापासून 20 मार्चदरम्यान पावसाचा प्रभाव आणखी वाढणार असून, 21 मार्चपासून हवामान स्थिर होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, Latur जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. यामुळे गहू, ज्वारी आणि आंबा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली किंवा वीज खांबाजवळ उभं राहू नये, असंही सांगण्यात आलं आहे.
👉 पुढील 24 तासांतील हवामानाचा अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या!
#WeatherUpdate #MaharashtraRain #Hailstorm #Farmers #Latur #IMD #BreakingNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: