तुका म्हणे भार घातलियावरी । होईल कैवारी नारायण ।। Hari Kirtan Seva
Автор: Hari Kirtan Seva
Загружено: 2026-02-16
Просмотров: 48
Описание:
भोग तो न घडे संचितावाचूनि । करावे ते मनी समाधान ।।
म्हणउनि मनी मानू नये खेदु । म्हणावा गोविंदु वेळोवेळा ।।
आणिका रुसावे न लगे बहुता । आपुल्या संचितावाचुनिया ।।
तुका म्हणे भार घातलियावरी । होईल कैवारी नारायण ।।
===============
तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याच्या वाट्याला येणारे भोग हे त्याच्या संचितामुळे, पूर्व कर्मांमुळे असतात. त्यामुळे ते भोगतेवेळी ते त्याने समाधान चित्ताने भोगावेत. किंबहुना आपल्याच पूर्वकर्माचे ते फळ असल्याने त्याविषयी मनात किंचितही खेद मानू नये. उलट अशावेळी वाचेने त्या एका श्री हरी गोविंदाचे नाम घ्यावे, त्याच्या नामाचा जयघोष करावा आणि मुख्य म्हणजे आपण भोगत असलेले भोग आपल्याच प्रारब्धाचे फळ असल्याने त्या भोगांना कंटाळून किंवा त्याचा मनस्ताप म्हणून इतर कोणावरही रुसू नये किंवा कोपू नये किंबहुना रुसावे लागल्यास त्याने आपल्या दैवावरच रुसावे. म्हणजे एका आपल्या नशिबाशिवाय किंवा संचिताशिवाय अन्य कोणावरही रुसू नये.
तुकोबाराय शेवटी म्हणतात परंतु ह्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो. म्हणजेच अशा परिस्थितीतून सहीसलामत सुटण्यासाठी मी तुम्हांला एक युक्ती सांगतो. ते म्हणतात देवाला श्रद्धेने शरण जाऊन जर एखाद्याने आपला संपूर्ण भार त्याच्यावर टाकल्यास मग देवालाही तो स्वतःच्या खांद्यावर घ्यावाच लागतो आणि शरण आलेल्यांचे रक्षण करावेच लागते . कारण ते म्हणतात शरण आलेल्यांना नारायण कधीही रिकाम्या हाताने धाडत नाही उलट त्यांचा कैवार घेऊन, त्यांना पाठीशी घालून किंबहुना त्यांचा संपूर्ण अंगीकारच करून त्यांचे सर्व भोग मग तो स्वतःच भोगतो.
अभंग १६३७
#TukaramGatha #Abhang #SantTukaram #VitthalBhakti #TukaMhane #harikirtanseva
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: