हिंदु-मुस्लीम यांचे महाराष्ट्रातील शाकाहरी गाव रेवणसिध्द मंदीर रेणावी आणि कौल लावायचा रहस्यमयी दगड.
Автор: Anil Shinde
Загружено: 2022-12-29
Просмотров: 83529
Описание:
#temple #devdarshan #vita #sangli
नमस्कार मित्रांनो 🙏
आपण आज या व्हिडीओ मध्ये सांगली जिल्ह्यातील रेणवीमधील रेवणसिध्द मंदीराचे दर्शन घेणार आहोत.
सांगली जिल्ह्यातील विटा शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या रेणावी या ५ हजार लोकसंख्येच्या गावात प्रसिद्ध रेवणसिद्ध मंदिर आहे या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे असून रेवणसिद्ध म्हणजेच नवनाथ संप्रदायापैकी सातवे नात रेवणनाथ यांची जागृत समाधी येथे आहे.नवनारायणाच्या अवतांरांपैकी हा चमस नारायणाचा अवतार होय.रेवणनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य होय. गुरु दत्तात्रेयांनी त्यांना सिद्धी दिली.
रेणावी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती-धर्माचे लोक शाहाकारी आहेत रेवणनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी दर अमावस्येला महाराष्ट्र सहित कर्नाटक आंध्र प्रदेशातून सुमारे सव्वा लाख भाविक येत असल्याचे मंदिरातील पुजारी सांगतात.
रेवणसिद्ध मंदिराच्या सभोवताली सुमारे ४० फूट उंच दगडाची संरक्षण भिंत आहे साधारणता १०० फूट बाय ८० फूट एवढ्या जागेत मंदिर आहे मंदिराच्या परिसरात रेवणसिद्धांचे आत्मलिंग, भव्य मूर्ती आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठी कमान आहे पायऱ्या चढून मंदिर परिसरात प्रवेश होतो बाजूला दीपमाळ आहे सणादिवशी व महाशिवरात्रीला दीपमाळ उजळली जाते.
श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात लिहिले आहे की सर्व नवनाथ १७८८ पर्यंत प्रकट रुपात होते नंतर ते आपल्या स्थानी गुप्त होऊन राहिले या ग्रंथातील ४० व्या अध्यायात रेवनाथांच्या स्थानाचा उल्लेख आढळतो. वीट ग्रामी मानदेशात तेथे राहिले रेवणनाथ असे या ग्रंथात म्हटले आहे नाथपंत वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील. एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उत्तम (सुमारे आठव्या ते बारावी शतकात ) आदिनाथ परमेश्वर शिव यांच्यापासून झाला अशी समजूत आहे रेवणनाथ यांचा प्रकट दिन सोहळा फाल्गुन शुद्ध त्रयोदशी दिवशी साधारणतः मार्च महिन्यात साजरा केला जातो त्यांच्या आदल्या दिवशी. नाथांची पालखी शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जाते दुसऱ्या दिवशी दुपारी रेवानाथांच्या समाधीवर पुष्पापर्ण पण केले जाते.
रेवणनाथाच्या जन्माची गोष्ट परिसरात सांगितले जाते ब्रह्मदेवाच्या बिजापासून पूर्वी ८८ सहस्त्र ऋषी उत्पन्न झाले त्याच वेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले त्यात चमस नारायणानेच संचार केला; तेव्हा पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्यासारखे तेजस्वी दिसू लागले त्याचवेळी सहन सारूख या नावाचा कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता त्याने ते मूल रेतीत रडत पडलेले पाहिले त्याने त्या मुलास उचलून घेतले व घरी नेले रेवातीरी रेवेत म्हणजे ( वाळूत ) पुत्र मिळाला म्हणून त्या मुलाचे नाव रेवणनाथ असे ठेवले.तेच हे रेवणनाथ होय.
आसेच नव-नवीन व्हिडीओ बघण्यासाठी आपल्या -
Travelling India या Facebook, Instagram आणि You Tube Channel ला Follow करा -
Facebook page-
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram page-
https://www.instagram.com/travelling_...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: